एम पी एस सी अथवा यु पी एस सी चा अभ्यास करताय? हे एकदा वाचा Can You Prepare for MPSC OR UPSC ? PLEASE READ THIS.

        आजची मुलं आणि मुली MPSC अथवा UPSC व इतर स्पर्धा परीक्षा ची तयारी करतात परंतु का बर काही मोजके वक्ती अथवा मुली त्या परीक्षा क्लिअर करत असतात. काय कमी असते? त्या मुली - मुलांत का बर परीक्षा क्लिअर होत नसते; काय वेगळं करतात की काही लवकर यशस्वी होतात.
        हल्लीची मुलं आणि मुली MPSC अथवा UPSC व इतर स्पर्धा परीक्षा वळण्याचा मार्ग हा जेव्हा ते पदवी प्राप्त करतात तेव्हा स्पर्धा परीक्षा द्यायचा विचार करतात त्याच ठिकाणी काही मुलं आणि मुली त्यांना माहीतच नसते की आपल्याला काय करायचे आहे. ते विचार करतात की १० th होऊ दे मग बघू ते म्हणता म्हणता हल्ली १० वी क्लिअर होते मग काय परत तेच १२ वी नंतर बघू असं म्हणता म्हणता पदवी पर्यंत शिक्षण होऊन जाते तरी त्यांना काय करायचं आहे. तेच माहिती नसते.

    मग काय हळू हळू वय वाढत जाते मग ते विचार करायला लागतात की आपण स्पर्धा परीक्षा द्यायची आणि क्लिअर करायची परंतू त्यात पण प्रॉब्लेम होत असतो. कारण त्यांना बेसिक क्लिअर नसतात. कारण स्पर्धा परीक्षा म्हटलं की आपल्याला सर्व काही क्लिअर असायला पाहिजे.

    कारण स्पर्धा परीक्षा फक्त बुद्धिमत्ता चेक तर केलीच त्यासोबतच परीक्षा चेक (every Level) ( फिसिकली, सायकॉलजी, मेंटली) त्यासाठी तुम्हाला स्वतःला त्या योग्यतेचा अधिकारी बनवावे लागेल.
 
    एका मूव्ही मधील म्हटलं आहे "काबिल बनो जनाब, कामयाबी झक मारके पीछे आयेगी" आजपासून स्वतला त्या योग्यतेसाठी तयार करायला शिका.

आज पासून स्वतः मध्ये बदल करायला सुरुवात करा.
फक्त एक गोष्ट बदल करायला काही दिवस ३ दिवस करून बघा त्यानंतर त्याचे रूपांतर एक एक दिवस वाढवून छोटे छोटे स्वतःला टास्क द्या व ते टास्क पूर्ण करा. व कॅलेंडर मध्ये चेक मार्क करा.

    त्यानंतर ते टास्क हळू हळू पूर्ण होताच २१ दिवसात त्याची रूपांतर आपल्या दिनक्रमात येईल. त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा आपण कोणत्या पोस्ट अथवा स्पर्धा परीक्षा साठी तयारी करायची आहे ते ठरवा!! मग अभ्यास क्रम तुमच्या समोर लटकवून ठेवा जे की तुम्हाला रोज दिसेल अशा ठिकाणी ठेवा.

    मग रोज एक एक विषय घेऊन आपल्या विषयांना अभ्यास करा. परंतु कितीही अभ्यास करून त्याला सराव करा. व त्याला लिमिट सेट करायला विसरू नका नाहीतर खूप कालावधी घेत असेल तर खूप वेळ निघून जातो. म्हणून १-२ वर्ष द्या माझ्या मते कारण वेळ खूप महत्वाची आहे.

आत्ता तुम्ही ठरवा काय करायचंय तुम्हाला? सर्व काही विसरून आपल्या स्वप्नांच्या मागे लागा कारण तुम्हीच स्वतःला घडवू शकता, श्री कृष्णा ने म्हटलं आहे " तुम्ही जो पर्यंत हरलो असे समजत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी हरवू शकत नाही" 

Wish you all the best!!!



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या