कचरा विषयी थोड जाणून घ्या व त्याचे व्यवस्थापन करा.

कचरा एक महत्वपूर्ण विषय असून त्यावर फारसे लक्ष केंद्रित केले जात नाही. असं का बरं!!! नेमकं हा कचरा कोणी निर्माण केलं असाव असा प्रश्न नेहमी पडतो ? हो ना होय त्यासाठी कोण जबाबदार आहे आम्ही, आपण सगळे कारणीभूत आहोत. कधी विचार केलाय की आपण एखादी वस्तू खरेदी केली आणि त्याचं काम झालं की लगेच रस्त्यावर किव्हा सार्वजनिक ठिकाणी ठाकत असतो. 

 २ ऑक्टोबर हा दिवस सार्वजनिक स्वच्छता दिवस म्हणून पाळला जातो. त्या दिवशी आपण सर्वजण सार्वजनिक स्वच्छता मोहीम सुद्धा राबवत असतो. आपण थोड विचार की स्वच्छता आपण त्याचं दिवशी पर्यंत न ठेवता किमान आपलं परिसर प्रत्येकाने स्वच्छ व नीट नेटक ठेवावं. जर प्रत्येकाने असं केलं तर आपणाला स्वच्छतेचा प्रश्नच पडणार नाही. त्यामुळे आपलं गाव पण सुधारेल व आपल्या गावाची उन्नती सुद्धा होईल.

स्वच्छतेविषयी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगितेत सांगतात
गाव हा विश्वाचा नकाशा | गावावरून देशाची परीक्षा||
गावची भंगता अवदशा | येईल देशा||

म्हणून आज गावात सुधारण्याची आवश्यकता आहे. कारण त्यावर देशाचे भवितव्य ठरते. एकदा नक्की विचार करा!! की भविष्यात कोरोना सारखे किंव्हा इतर रोग यांच्याशी सामना करावा लागणार नाही याचं विचार करा. 

स्वच्छता हा एक महत्वपूर्ण विषय असून त्यामुळे भारत सरकार स्वच्छ भारत अभियान दर वर्षी २ऑक्टोबर ला राबवत असते. त्यामध्ये स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जाते. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या